कर्जासाठी जामीनदार होताय… जरा थांबा.. त्या संबंधित काही महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

बिझनेसनामा । कोणत्याही व्यक्तीला जेव्हा पैशांची गरज भासते तेव्हा तो कर्ज मिळवण्यासाठी बँकेकडे अर्ज करतो. मात्र बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीला जामीनदार द्यावा लागतो. अनेकदा लोकं अडचणीच्या काळात मदत म्हणून मित्र किंवा नातेवाईकांच्या कर्जासाठी जामीनदार बनतात. मात्र कर्जासाठी जामीनदार बनणे ही फक्त औपचारिकता नसून ती एक प्रकारची जबाबदारी आहे.

हे लक्षात घ्या कि, जामीनदार असलेल्या व्यक्तीला देखील बँकेकडून एक प्रकारे कर्जदाताच मानले जाते. एखाद्यासाठी जामीनदार राहिल्याने आपल्याकडून बँकेला ही गॅरेंटी दिली जाते की, जर कर्जदाराने कर्जाची परतफेड (Loan) केली नाही तर बँक तुमच्याकडून कर्ज परत घेऊ शकेल. जर आपण एखाद्यासाठी जामीनदार झालात तर आपल्यावर देखील काही जबाबदाऱ्या अप्रत्यक्षपणे येतात. हे लक्षात घ्या कि, बँका किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेकडून जामीनदाराशिवाय कर्ज दिले जात नाही. चला तर मग आज आपण त्याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊयात …

कर्जासाठी जामीनदार राहणे म्हणजे काय ???

एखाद्यासाठी कर्जाचा जामीनदार राहणाऱ्या व्यक्तीवर ही जबाबदारी असते कि, जर कर्जदाराने कर्जाची परतफेड (Loan) केली नाही तर जामीनदार त्या कर्जाची परतफेड करेल. त्याच बरोबर कर्जाचा जामीनदार होण्यासाठी अनेक कागदपत्रांवर स्वाक्षरी देखील करावी लागते. याचा अर्थ असा की, आपल्याला जामीनदार होण्याचे नियम आणि अर्थ माहित आहे. तसेच आपण नीट विचार करून स्वतःच्या निर्णयाने जामीनदार होत आहात.

… तर होऊ शकेल कायदेशीर कारवाई

बँकांच्या नियमांनुसार कर्जाचा जामीनदार राहणाऱ्या व्यक्तीलाही कर्जदारच मानले जाते. तसेच जर कर्ज घेणारी व्यक्ती डिफॉल्टर झाली तर जामीनदारावर देखील कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्याच बरोबर जर कर्जदाराकडून (Loan) योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर कर्जदाराबरोबरच जामीनदाराला देखील नोटीस पाठवली जाते.

कोणत्या परिस्थितीमध्ये जामीनदाराची गरज भासते ???

हे लक्षात घ्या कि, बँकांकडून सर्व प्रकारच्या कर्जासाठी जामीनदाराचा आग्रह धरला जात नाही. जेव्हा एखाद्या प्रकरणी पुरेशी गॅरेंटी असेल आणि बँकेला कर्जाच्या परतफेडीबाबत (Loan) शंका असेल तेव्हाच बँकेकडून जामीनदार आणण्यास सांगितले जाते. तसेच मोठ्या रकमेच्या कर्जासाठी देखील जामीनदार असणे महत्वाचे ठरते.

इन्शुरन्स घ्या

जर आपण एखाद्यासाठी कर्जाचे जामीनदार होत असाल तर त्याला आपल्या कर्जाचा इन्शुरन्स काढण्यास सांगा. कारण जर कोणत्याही कारणास्तव कर्जदाराचा मृत्यू झाला किंवा एखादी वाईट घटना घडली तर या कर्जाची परतफेड (Loan) करण्याची जबाबदारी ही सदर इन्शुरन्स कंपनीची असेल. अशा प्रकारे आपण अडचणीत सापडू शकणार नाही.