Paytm Crisis: Paytmची सेवा अविरत सुरु राहणार; काय म्हणाले CEO शर्मा?

Paytm Crisis: भारताच्या रिझर्व्ह बँकेने Paytm पेमेंट बँकेच्या ग्राहकांसाठी पैसे जमा करण्याची आणि व्यवहार करण्याची मुदत वाढवली आहे. या निर्णयानंतर, Paytmचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी स्पष्ट केले आहे की Paytm QR, Soundbox, Card Machine हे सर्व मार्च 15 नंतरही चालू राहतील आणि RBIच्या निर्बंधांचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. सोबतच, ग्राहकांना त्यांचे खाते बंद करण्याची आवश्यकता नाही.

Paytm ची सेवा 15 नंतरही सुरु राहणार? (Paytm Crisis)

सर्वोच्य बँकेने आदेश दिले होते की Paytm Payment Banksच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यात जमा, कर्ज देवाणे किंवा Wallet Recharge करता येणार नाही. ही मुदत आधीच्या 29 फेब्रुवारी 2024 वरून वाढवून आता 15 मार्च 2024 अशी करण्यात आली आहे. मात्र ही सेवा अखंड सुरु राहील अशी माहिती कंपनीचे CEO विजय शेखर शर्मा यांनी शेअर केली, तसेच त्यांनी लोकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि डिजिटल इंडियाला पुढे नेण्याचे आवाहन केले आहे.

RBIच्या घोषणेनंतर, शर्मा यांनी त्यांच्या सोशल मीडिया साइट X वर कंपनीच्या ग्राहकांचे पाठिंबा दाखवल्याबद्दल आभार मानले(Paytm Crisis). सोबतच त्यांनी आश्वासन दिले की Paytm 29 फेब्रुवारीच्या पुढेही चालू राहील. “डिजिटल पेमेंटमध्ये नवीन संकल्पना आणि आर्थिक सुविधांमध्ये सर्वांना सहभागी करून घेण्याच्या बाबतीत भारताला जागतिक स्तरावर कौतुका मिळत राहतील,” असे शर्मा यांनी नमूद केले. “यामध्ये PaytmKaro ही सेवा आघाडीवर राहून भारताला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.” असे पोस्टमधून सांगितले.