Privatization Of Company : मोदी सरकार विकणार आणखी एक कंपनी; काय आहे यामागील कारण?

Privatization Of Company : मोदी सरकार येत्या काही दिवसांतच सरकारी अख्त्यारीत असलेल्या एका कंपनीचे खासगीकरण करणार आहेत. मोदी सरकारची हि काही खासगीकरणाची पहिली खेप नाही आणि याचे नियोजन त्यांनी गेल्या वर्षीच केले होते. हि कंपनी काही तुमच्यासाठी नवीन नाही आपण कधी न कधी या कंपनीचे नाव नक्कीच ऐकलेलं आहे, मेनकायंड आणि बैद्यनाथ आयुर्वेद अशी या कंपन्यांची नावं असून सरकार यांची जबाबदारी दुसऱ्या मालकाच्या खांद्यावर देऊ पाहत आहे.

सरकार करणार ‘या’ कंपन्यांचे खासगीकरण : Privatization Of Company

काही दिवसानंतर केंद्र सरकार आपल्या मालकीच्या अजून दोन कंपन्यांचे खासगीकरण करणार असल्याची बातमी समोर आली आहे. मेनकायंड आणि बैद्यनाथ अश्या या दोन्ही कंपन्यांना सरकार इंडिअन मेडीसिन्स फार्मसुटिकल कोर्पोरेशनला विकणार (Privatization Of Company) आहे, यात पतंजली हि कंपनी सर्वात अधिक खरेदीचा उत्साह दाखवेल अशी सरकारला अपेक्षा होती पण या कंपनीकडून EOI सदर करण्यासाठी नकार देण्यात आला आहे.

कंपनी कमावते 250 कोटी रुपये :

सध्या पुन्हा एकदा आपण आयुर्वेदिक औषधांकडे वळत असल्यामुळे या कंपनीचा महसूल 250 कोटी रुपये आहे आणि त्यांच्या नफ्याचे प्रमाण 25 टक्के आहे. या सरकारी कंपनीची सुरुवात वर्ष 1978 मध्ये झाली होती आणि तेव्हापासून हि कंपनी सरकारच्या मालकीत येणाऱ्या दवाखान्यांना औषधांचा पुरवठा करते. कंपनी सध्या 656 आयुर्वेदिक औषधे तयार करते आणि सध्या हि कंपनी आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे(Privatization Of Company).